अब की बार..डेंग्यु की हार !

अंधेरी - डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार आणि आरोग्य विभाग कसोशीनं उपाययोजना करत आहे. अंधेरीच्या आरोग्य केंद्रातर्फे जोगेश्वरी परिसरात जनजागृती मोहीम राबवली. यावेळी आरोग्य केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन डेंग्यू आजाराबाबत जनजागृती केली.

एप्रिल महिन्यापासून आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जातेय. पण नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याचं सार्वजनिक आरोग्य केंद्र परिचारिका सुबाधा वाणी यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या