ही मुंबईकरांची लढाई - आदित्य ठाकरे

घाटकोपर (पू) - महापालिका निवडणूक ही मुंबईसाठीची लढाई आहे. मुंबई गिळून टाकण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. घाटकोपरमधील अरुण कुमार मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.

गेल्या पाच वर्षांत शिवसेना पालिका शाळेचे नुतनीकरण, रुग्णालयाचा दर्जात सुधारणा, शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी टॅब, व्हर्च्युअल क्लासरुम ही सर्व कामं did you know माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत आहे.

भाजपा हा गुंडाचा पक्ष असून मुख्यमंत्री अशा लोकांसोबत फोटो काढताना दिसतात. भाजपा मुंबईचा विकास करणार नसून ते मुंबई गिळकृंत करणार आहे. पैशाच्या जोरावर मुंबई जिंकण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, अशी ही टीका आदित्य ठाकरेंनी या वेळी भाजपावर केली.

पुढील बातमी
इतर बातम्या