'शिवसेनेच्या बंडखोरांना मुख्यमंत्र्यांचे संरक्षण'

मुंबई - मुख्यमंत्री गृहमंत्रीपदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेले आणि शिवसेनेमधून इतर पक्षात गेलेल्या उमेदवारांना संरक्षण देण्याचे काम केले जात आहे. तसा आदेशच मुख्यमंत्र्यांनी सर्व पोलीस ठाण्यात दिल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. सर्व पक्षातील उमेदवारांना समान न्याय असावा असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या