अमरावती बंद: इंटरनेट सेवा पूर्ववत, कर्फ्यू अंशतः उठवला

अमरावती शहर पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी शुक्रवारी, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय अमरावतीमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत संचारबंदी उठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासह, संचारबंदी पुन्हा संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि सकाळी ९ वाजेपर्यंत लागू राहील. शुक्रवारी कर्फ्यू उठवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

भाजप या राजकीय पक्षानं पुकारलेल्या बंददरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर गेल्या शनिवारपासून अमरावतीत गेल्या सात दिवसांपासून संचारबंदी आहे.

याशिवाय, गुरुवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते पहाटे ५ या वेळेत कर्फ्यू शिथिल करण्यात आला. परंतु केवळ अत्यावश्यक सेवांसाठी कर्फ्यू शिथिल केला गेला. यामध्ये किराणा माल, भाजीपाला आणि औषधे खरेदीचा समावेश होता. याव्यतिरिक्त, सरकारी सेवा जसे की बँका पुन्हा सुरू झाल्या आणि सरकारी कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेट देण्याची परवानगी देण्यात आली.

शिवाय, अलीकडेच, संबंधित अधिकाऱ्यांनी मालेगाव आणि नांदेडमध्ये झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली सुमारे ११९ लोकांना अटक केली होती. त्रिपुरामध्ये झालेल्या कथित हिंसाचारामुळे हा हिंसाचार घडल्याचा दावा केला जात आहे.


हेही वाचा

Farm Laws : सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली - मुख्यमंत्री

सुधारित कृषी कायदे मागे घेत असल्याची पंतप्रधान मोदी यांची घोषणा

पुढील बातमी
इतर बातम्या