विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

दादर - परीक्षा देऊन पास झाल्यानंतरही पश्चिम रेल्वेनं भरती न करून घेतल्यानं विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. 2012 मध्ये पश्चिम रेल्वेच्या परिक्षेत अडीच हजार विद्यार्थी पास झाले होते. "एक वर्षाची अप्रेंटिसची ट्रेनिंग झाल्यानंतरही रेल्वे प्रशासनानं भरती करून घेतली नाही," असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पण त्यानतंर झालेल्या सेंट्रल रेल्वेच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची लगेच भरती करण्यात आली.

"सध्या 400 विद्यार्थी मुंबईत आले असून प्रशासन आमची दिशाभूल करत आहे," असं दिपेन बडणे यांनी सांगितलं. "प्रशासन याकडे काणाडोळा करतंय का? हे तपासलं जाईल आणि लवकरात लवकार हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या