आम्ही चूल पेटवण्यासाठी काम करतो, तर ते घर पेटवण्यासाठी - आदित्य ठाकरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. "आम्ही चूल पेटवण्यासाठी काम करत आहोत. परंतु, काही लोक घर पेटवण्यासाठी काम करत आहेत. अशा लोकांवर काय बोलायचं? असा टोला आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

बृहमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाअंतर्गत "अक्षय चैतन्य" सकस आहार योजनेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. "महाविकास आघाडी सरकार शाश्वत विकास कामातून बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, विरोधी पक्ष भांडणं कशी लागतील? देश कसा विखुरला जाईल? समाज कसा विखुरला जाईल? यासाठी प्रयत्न करत आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

फडणवीसांनी आपण बाबरी पाडली तेव्हा अयोध्येमध्ये होतो असा दावा केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असताना आदित्य ठाकरेंनी, “१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल,” अशी खोचक प्रतिक्रिया दिली.


हेही वाचा

औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरेचं ट्विट, ईदनिमित्त घेतला मोठा निर्णय

“भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजेत, पण…”

पुढील बातमी
इतर बातम्या