मुंबई - पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांबद्दल विधानसभा आणि विधान परिषदेत शनिवारी चिंता व्यक्त करण्यात आली. चार वर्षात 337 पत्रकार आणि 52 मीडिया हाऊसवर हल्ले झाले आहेत. अशा परिस्थितीमध्येही पत्रकार संरक्षण कायदा का केला जात नाही? असा प्रश्न भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला. गेली काही वर्ष पत्रकार संघटना पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा करा, अशी मागणी सातत्यानं करत आहेत.
पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला असून अद्याप पोलिसांना आरोपी सापडू शकले नाहीत, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रियी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी दिली. तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही घटनेचा निषेध व्यक्त केला.