मुंबईची सुरक्षा रामभरोसे - दामोदर तांडेल

मुंबई - मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला आठ वर्ष पूर्ण होत असली तरी राज्याची सागरी सुरक्षा रामभरोसे असल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय. मुंबईच्या समुद्रकिनारी बोटीवर काम कारणा-या कामगारांमध्ये 60 टक्के कामगार नेपाळी, बांगलादेशी, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील असल्याचं कोस्ट गार्डची 15 जानेवारी 2015 मध्ये एका महत्वाच्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नाही. कोस्टल गार्ड विभागाला याबाबत माहिती असूनही यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप केली नाही असा दावाही अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या