“ज्या पद्धतीने मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भावर सर्व राज्यात झाला. त्याच्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालय जबाबदार नाहीत का ?, अजित डोवाल यांना रात्री दोन वाजता मरकजमध्ये का पाठवले, हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे आहे, दिल्ली पोलीस आयुक्तांचे असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. अजित डोवाल व तबलिगीचे पुढारी मौलाना साब रात्री दोन वाजता मरकजमध्ये अशी काय गुप्त चर्चा करत होते. डोवाल व दिल्लीचे पोलीस आयुक्त दोघांनी या विषयावर बोलायचे का टाळले आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अजित डोवाल यांना भेटल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मौलाना साब कुुठे फरार झाले व आता ते कुठे आहेत, असा प्रश्न करून देशमुख यांनी म्हटले की कोणाशी त्यांचे संबंध आहेत, मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमची, प्रोग्रॅमला रोखल नाही तुम्ही, तबलिगशी संबंध तुमचे, या सर्व प्रश्नांचे उत्तर कोण देणार,” असा प्रश्नही देशमुख यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.