उजबेकीस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांचा जयंत पाटलांना व्हिडिओ काॅल

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) संसर्गामुळे संपूर्ण जग हादरूद गेलं आहे. या व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून बहुतेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे पर्यटनासाठी उज़्बेकिस्तानच्या (uzbekistan) ताश्कंद इथं गेलेले महाराष्ट्रातील जवळपास ३९ प्रवासी विमानसेवा नसल्याने अडकून पडले आहेत. मायदेशी परतण्याची शक्यता दिसत नसल्याने घाबरून या पर्यटकांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना उज़्बेकिस्तान येथून व्हिडिओ कॉल केला. त्यावेळेस त्यांना मायदेशी आणण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करण्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं.

महाराष्ट्रातील जवळपास ३९ पर्यटक १० मार्च रोजी भारतातून ताश्कंदला पर्यटनासाठी गेले होते. तर सोमवार १६ मार्च रोजी हे पर्यटक मायदेशी परतणार होते. मात्र ऐनवेळी त्यांना विमानसेवा उपलब्ध न झाल्याने त्यांना उजबेकीस्तानमध्येच अडकून पडावं लागलं. त्यानंतर घाबरलेल्या या पर्यटकांनी जयंत पाटील यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. जयंत पाटलांनी (jayant patil) त्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन करतानाच मायदेशात परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.

यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले, अभिजित चिमाण्णा व सहकाऱ्यांनी काल रात्री मला ताश्कंद येथून फोन केला. महाराष्ट्रातील या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी मी सर्वोतोपरीने प्रयत्न करेन. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी बोलण्याची विनंती करेन,

 केंद्राकडे शब्द टाकण्यासाठी विनंती करेल, असं आश्वासन जयंत पाटील यांनी त्या पर्यटकांना दिलं.

पुढील बातमी
इतर बातम्या