राष्ट्रवादीची चेंबूरमध्ये परिवर्तन रॅली

चेंबूर - पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांकडून सध्या निवडणुकीची जय्यद तयारी सुरू आहे. शनिवारी राष्ट्रवादीच्या वतीनं चेंबूरमध्ये परिवर्तन रॅली काढण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मोदी सरकारवर प्रमाणात निशाणाही साधला. 'मोदी आले मात्र चांगले दिवस आले नाहीत, केवळ अंबानी आणि रामदेवबाबांसाठी मोदी सरकार' असल्याची टीका देखील त्यांनी या वेळी केली. तर राष्ट्रवादीचे चिटणीस रवींद्र पवार यांनी देखील पालिकेत सत्तेवर असलेल्या सेना-भाजपवर टीका करत यावेळी चेंबूरमध्ये राष्ट्रवाडीचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

पुढील बातमी
इतर बातम्या