नारायण राणेंनी का घेतली मुख्यमंत्र्यांची भेट?

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.

कशावर झाली चर्चा?

या भेटीला नारायण राणे यांनी दुजोरा दिला असला तरी चर्चा नेमकी कशावर झाली, याबाबत काहीही सांगितलेले नाही. तसेच पोटनिवडणुकीबाबतची भूमिका पत्रकार परिषद घेऊन लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले आहे.

भेटीमागचे कारण?

नारायण राणे विधान परिषद पोटनिवडणूक लढवणार का, लढवली नाही तर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश कसा केला जाईल, याबाबत चर्चा सुरू असतानाच ही भेट घेण्यात आली. त्यामुळे या भेटीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे

पुढील बातमी
इतर बातम्या