शाईचा निर्णय बदलण्याची निवडणूक आयोगाची मागणी

मुंबई - बोटांवर शाई लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय. बोटांवर लावली जाणारी शाई बँकांमध्ये वापरू नका, असे पत्र निवडणूक आयोगानं अर्थमंत्री अरूण जेटली यांना लिहिलंय. अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोट निवडणूका होतायेत त्यामुळे बोटांना शाई लावण्याचा निर्णय सरकारनं बदलावा अशी मागणी सरकारनं केलीय. काळा पैसा रोखण्यासाठी नोटा बदली करणाऱ्यांच्या बोटांना शाही लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या