जरा याद करो कुर्बानी...

मुलुंड - उरी दहशतवादी हल्ल्यात शहीत झालेल्या 18 जवानांना शिवसैनिकांनी मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर अमर जवान स्मारक उभारून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. चहावर चर्चा खूप झाली आता बदल्याची वेळ आहे असा टोला यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी मोदींना लगावला.

ईशान्य मुंबई विभाग प्रमुख सत्यजित दळवी यांच्या नेतृत्वाखाली श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सैनिक रमेश गोसावी यांच्यासह मुलुंड विधानसभा कार्यालय प्रमुख विलाससिंग रजपूत, शाखा प्रमुख दिपक सावंत, भालेश म्हात्रे, अविनाश बागुल, दर्शन जोशी, बाबा भगत, चंद्रकांत शेलार इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या