राज्यात 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी

मुंबई - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने टोलमाफीची सूट वाढवलीय. राष्ट्रीय महामार्गांवर 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातही टोलमाफीची घोषणा केली. मुंबईसह राज्यातील सर्व टोलनाक्यांवर 14 नोव्हेंबरपर्यंत टोल वसुली होणाराय. "गरज पडल्यास आणखी काही दिवस टोलमाफी केली जाऊ शकते," असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या