शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी २७ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा लाँग मार्च पून्हा एकदा मुंबईत धडकणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी लाँग मार्चचं आयोजन केलं होतं. त्यावेळी सरकारनं मागण्या मान्य करत लवकरच त्या पूर्ण करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं. मागण्या मान्य होऊनही त्याची अमलबजावणी न झाल्यानं किसानं सभेनं लाँग मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी हा मोर्चा मुंबईत दाखल होणार आहे.
सरकारनं या लाँग मार्चकडे दुर्लक्ष केल्यास कामगारही शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी रस्त्यावर उतरतील. त्याचप्रमाणे सर्व संघटना आणि पक्षांच्या नेत्यांना सामावून घेण्यात येईल. वेळ पडल्यास महाराष्ट्र बंदचीही हाक देऊ अशी माहिती डॉ. डी.एल. कराड यांनी दिली.
हेही वाचा