'मराठी माणसासाठी काय पण'

दादर - 'मी स्वत:साठी नाही तर मराठी माणसासाठी कोणाचेही पाय चाटेन, पण मुंबईला राज्यापासून तोडले तर प्रसंगी पाय छाटून टाकेन असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केलं. तसेच शिवसेना राज्यात आणि केंद्रात पैशाच्या कारणामुळे वेगळे होत नाहीत. त्यांना महापौर बंगला पाहिजे, बाळासाहेबांचे स्मारक फक्त कारण आहे. यांचा डोळा महापौर बंगल्यावर आहे अशी टीका राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजपावर केली.

पुढील बातमी
इतर बातम्या