पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केलं. कोरोनाव्हायरसचा उद्रेक पाहता लोकांना अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या गोष्टींवर काही बोलतील. जसं की लॉकडाऊन (Lockdown 4) वाढणार की नाही? लॉकडाऊन वाढणार असेल तर पुढे काय उपाय योजना केल्या जातील. लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था (Aaatmanirbhar Bharat) कशी मजबूती देता येईल? या संदर्भातील घोषणांची अपेक्षा होती.
पण ३५ मिनिटांच्या भाषण देशवासियांसाठी निराशादायी ठरलं. बराच वेळ लोकं गोंधळात होती. कुठल्या तरी ठोस निर्णयांची लोकांना अपेक्षा होती. पण भाषणातून त्यांची अपेक्षा पूर्ण न झालेल्या नेटिझन्सनी ट्विटरवर मोदी यांच्या भाषणातील आत्मनिर्भर (Aatmanirbhar) या वक्त्यव्यावरून मिम्स बनवण्यास सुरुवात केली. अशाच काही मिम्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.