भारतातील पुरुषांसाठी सर्वांत मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा ठरलेली रुबरू मिस्टर इंडिया २०१९ प्रथमच मुंबईत आयोजित करण्यात आली होती. २६ एप्रिल ते ३० एप्रिल असे ५ दिवस ही स्पर्धा रंगली. जुहू इथल्या सी प्रिंसेस हॉटेलध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. रुबरी ग्रुपद्वारे आयोजित या स्पर्धेचं हे १६ वं वर्ष होतं. पंकज खारबंदा हे या स्पर्धेचे आयोजक आहेत.
रुबरू मिस्टर इंडियाचा किताब
रुबरू मिस्टर इंडिया २०१९ या स्पर्धेचा किताब मॉडल सय्यद जैन या तरूणानं जिंकला आहे. देशात विविध ठिकाणी आयोजित निवड चाचण्यांमधून विविध नवे आणि उभरते चेहरे या स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. जुहू इथल्या हॉटेलमध्ये आयोजित या स्पर्धेत अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. संभाषण कौशल्य, हुषारी, सादरीकरण, शारीरिक तंदुरुस्ती आदी निकषांवर या स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात आली.
प्राथमिक फेऱ्या आणि चाचण्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेले ३८ स्पर्धक यात सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना आगामी काळातील जागतिक स्तरावरील प्रमुख स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
मुंबईच्या सागरची यशस्वी वाटचाल
मिस्टर वेस्ट इंडिया आणि परफेक्ट फिजिकचा किताब मुंबईच्या सागर आमले या मराठमोळ्या तरुणानं पटकावला. रुबरू इंडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० हजार तरूणांना मागे सारत सागर आमले या तरूणानं अंतिम फेरीत मजल मारली होती आणि आता त्यानं दोन किताब आपल्या नावे केले. बॉडीबिल्डींगपासून सुरुवात केल्यानंतर सागर मेन्स फिजिक्सकडे वळला. मेन्स फिजिक्सच्या क्षेत्रात पिळदार शरीरसृष्टी कमवल्यानंतर तो एक पायरी पुढे चढत रुबरू मिस्टर इंडियाच्या स्पर्धेत सहभागी झाला.
रुबरू मिस्टर वेस्ट इंडिया आणि परफेक्ट फिजिक हे किताब जिंकण्यामागे सागरची प्रचंड मेहनत तर आहेच. त्याच्या या यशात त्याचे फिटनेस गुरू मनिष आडविलकर आणि स्पर्धेसाठी डांसचे ट्रेनिंग देणारा अक्षय मोरे यांचा देखील हात आहे. याशिवाय त्याच्या पूर्ण प्रवासात कुटुंबियांची साथ तर होतीच.
दिग्गजांची हजेरी
रुबरू मिस्टर इंडिया २०१९ स्पर्धेसाठी फॅशन विश्वातील, टीव्ही क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी होते. यावेळी फॅशन डिजायनर रोहिम वर्मा यांच्याद्वारे एका फॅशन शोचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय निशा रावल, करण मेहरा, कवलजीत सिंह, विंदू दारा सिंह, करण, राकेश पॉल, गुलफाम खान, रेहान शाह, जिया मानेक असे अनेक मान्यव्यर सहभागी होते.
मिस्टर इंडियाचं स्वरूप
भाषण कौशल्य, हुषारी, सादरीकरण, शारीरिक तंदुरुस्ती आदी निकषांवर तुमची निवड केली जाते. प्राथमिक फेऱ्या आणि चाचण्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्यांची जेतेपदासाठी कसोटी लागते. स्पर्धेतील विजेत्यांना आगामी काळातील जागतिक स्तरावरील प्रमुख स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. याशिवाय रुबरू मिस्टर इंडिया विजेत्यांना या उदात्त, सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्याची संधी मिळते. तसंच १२ महिन्यांच्या काळात त्यांना विविध सामाजिक आणि फॅशन उपक्रमांमध्ये सहभागी होता येतं.
या स्पर्धेत सात-आठ फेऱ्या होतात. अंतिम फेरीमध्ये फॅशन विश्वातील मोठे-मोठे डिझायनर्स देखील तिथे उपस्थित असतात. त्यांनी डिझायन केलेले पेहराव परीधान करण्याची संधी म़ॉडल्सना मिळते. याशिवाय नामवंत फोटोग्राफर्सकडून तुंमचे फोटो क्लिक केले जातात. एकप्रकारे स्पर्धकांचं ग्रुमींग सेशन केलं जातं.
स्पर्धेची सुरुवात
रुबरू मिस्टर इंडिया ही पुरुषांसाठीची भारतातील सर्वांत जुनी व लोकप्रिय अशी स्पर्धा गणली जाते. २००४ साली उत्तर भारतात पुरुष मॉडेल स्पर्धा म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता लोकप्रिय पुरुष मॉडेलिंग स्पर्धा म्हणून उदयास आला आहे. रुबरू मि. इंडिया उपक्रम १० जागतिक उपक्रमाशी संलग्न असून या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेत्यांना एक व्यासपीठ देऊन देशासाठी गौरवशाली, अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
झगमगत्या दुनियेबरोबरच या उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणासारख्या उदात्त कार्यालाही प्रोत्साहन, पाठबळ दिले जाते. रुबरू मि. इंडिया विजेत्यांना या उदात्त, सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान देण्याची संधी मिळते. तसंच १२ महिन्यांच्या काळात त्यांना विविध सामाजिक आणि फॅशन उपक्रमांमध्ये सहभागी होता येतं.
भारतातील पुरुषांसाठी सर्वांत मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा ठरलेली रुबरू मिस्टर इंडिया २०१९ प्रथमच मुंबईत आयोजित करण्यात आली होती. २६ एप्रिल ते ३० एप्रिल असे ५ दिवस ही स्पर्धा रंगली. जुहू इथल्या सी प्रिंसेस हॉटेलध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. रुबरी ग्रुपद्वारे आयोजित या स्पर्धेचं हे १६ वं वर्ष होतं. पंकज खारबंदा हे या स्पर्धेचे आयोजक आहेत.
रुबरू मिस्टर इंडियाचा किताब
रुबरू मिस्टर इंडिया २०१९ या स्पर्धेचा किताब मॉडल सय्यद जैन या तरूणानं जिंकला आहे. देशात विविध ठिकाणी आयोजित निवड चाचण्यांमधून विविध नवे आणि उभरते चेहरे या स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. जुहू इथल्या हॉटेलमध्ये आयोजित या स्पर्धेत अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. संभाषण कौशल्य, हुषारी, सादरीकरण, शारीरिक तंदुरुस्ती आदी निकषांवर या स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात आली.
प्राथमिक फेऱ्या आणि चाचण्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेले ३८ स्पर्धक यात सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना आगामी काळातील जागतिक स्तरावरील प्रमुख स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
मुंबईच्या सागरची यशस्वी वाटचाल
मिस्टर वेस्ट इंडिया आणि परफेक्ट फिजिकचा किताब मुंबईच्या सागर आमले या मराठमोळ्या तरुणानं पटकावला. रुबरू इंडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० हजार तरूणांना मागे सारत सागर आमले या तरूणानं अंतिम फेरीत मजल मारली होती आणि आता त्यानं दोन किताब आपल्या नावे केले. बॉडीबिल्डींगपासून सुरुवात केल्यानंतर सागर मेन्स फिजिक्सकडे वळला. मेन्स फिजिक्सच्या क्षेत्रात पिळदार शरीरसृष्टी कमवल्यानंतर तो एक पायरी पुढे चढत रुबरू मिस्टर इंडियाच्या स्पर्धेत सहभागी झाला.
रुबरू मिस्टर वेस्ट इंडिया आणि परफेक्ट फिजिक हे किताब जिंकण्यामागे सागरची प्रचंड मेहनत तर आहेच. त्याच्या या यशात त्याचे फिटनेस गुरू मनिष आडविलकर आणि स्पर्धेसाठी डांसचे ट्रेनिंग देणारा अक्षय मोरे यांचा देखील हात आहे. याशिवाय त्याच्या पूर्ण प्रवासात कुटुंबियांची साथ तर होतीच.
दिग्गजांची हजेरी
रुबरू मिस्टर इंडिया २०१९ स्पर्धेसाठी फॅशन विश्वातील, टीव्ही क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी होते. यावेळी फॅशन डिजायनर रोहिम वर्मा यांच्याद्वारे एका फॅशन शोचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय निशा रावल, करण मेहरा, कवलजीत सिंह, विंदू दारा सिंह, करण, राकेश पॉल, गुलफाम खान, रेहान शाह, जिया मानेक असे अनेक मान्यव्यर सहभागी होते.
मिस्टर इंडियाचं स्वरूप
भाषण कौशल्य, हुषारी, सादरीकरण, शारीरिक तंदुरुस्ती आदी निकषांवर तुमची निवड केली जाते. प्राथमिक फेऱ्या आणि चाचण्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्यांची जेतेपदासाठी कसोटी लागते. स्पर्धेतील विजेत्यांना आगामी काळातील जागतिक स्तरावरील प्रमुख स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. याशिवाय रुबरू मिस्टर इंडिया विजेत्यांना या उदात्त, सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्याची संधी मिळते. तसंच १२ महिन्यांच्या काळात त्यांना विविध सामाजिक आणि फॅशन उपक्रमांमध्ये सहभागी होता येतं.
या स्पर्धेत सात-आठ फेऱ्या होतात. अंतिम फेरीमध्ये फॅशन विश्वातील मोठे-मोठे डिझायनर्स देखील तिथे उपस्थित असतात. त्यांनी डिझायन केलेले पेहराव परीधान करण्याची संधी म़ॉडल्सना मिळते. याशिवाय नामवंत फोटोग्राफर्सकडून तुंमचे फोटो क्लिक केले जातात. एकप्रकारे स्पर्धकांचं ग्रुमींग सेशन केलं जातं.
स्पर्धेची सुरुवात
रुबरू मिस्टर इंडिया ही पुरुषांसाठीची भारतातील सर्वांत जुनी व लोकप्रिय अशी स्पर्धा गणली जाते. २००४ साली उत्तर भारतात पुरुष मॉडेल स्पर्धा म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता लोकप्रिय पुरुष मॉडेलिंग स्पर्धा म्हणून उदयास आला आहे. रुबरू मि. इंडिया उपक्रम १० जागतिक उपक्रमाशी संलग्न असून या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेत्यांना एक व्यासपीठ देऊन देशासाठी गौरवशाली, अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
झगमगत्या दुनियेबरोबरच या उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणासारख्या उदात्त कार्यालाही प्रोत्साहन, पाठबळ दिले जाते. रुबरू मि. इंडिया विजेत्यांना या उदात्त, सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान देण्याची संधी मिळते. तसंच १२ महिन्यांच्या काळात त्यांना विविध सामाजिक आणि फॅशन उपक्रमांमध्ये सहभागी होता येतं.