राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय व खाजगी कंपन्या यांनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी जेथे अधिक बसेस सोडण्याची आवश्यकता आहे तेथे त्यानुसार त्वरित कार्यवाही करुन प्रवाशांची संभाव्य गैरसोय दुर करण्याच्या सूचना एसटी महामंडळाला देण्यात आल्या आहेत. परंतु, अनेकदा अशा संधीचा फायदा घेऊन खाजगी बसेसकडून प्रवाशांची लूटमार होते. त्यामुळे ही लूटमार थांबवण्यासाठी व अधिकचे प्रवास भाडे घेण्यात आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले.
याप्रकरणी 'अत्यावश्यक सेवा वगळता खबरदारीची उपाययोजना म्हणून काही खाजगी कंपन्यानी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तसंच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी,प्रवाशी गावी जात आहेत.
या काळात खाजगी बस सेवांनी अधिक चे प्रवास भाडे घेतल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. खाजगी बससेवांनी सामाजिक बांधीलकीतुन योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करून सहकार्य करावे असंही अनिल परब यांनी म्हटलं.
एसटी प्रशासनाकडून खबरदारी