02/12
मुंबईत पावसाळ्यात (Mumbai Rian) पाणी साचण्याची समस्या काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. मुंबईची तुंबई झाली की याचा परिणाम अर्थात सार्वजनिक वाहतूक सेवेवर होतो. मुंबईची लाईफलाईन, बस सेवा अगदी सार्वजनिक वाहनं एकूणच काय तर सगळ्या सेवांवर परिणाम होतो. वाहनांचेच काय मुंबईकरांना पण त्या घाणेरड्या पाण्यातून वाट काढत चालावे लागते.
03/12
पण येत्या काळात पावसाळ्यात मुंबईतील वाहतूक व्यवस्था बदलेल का? असा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या AI फोटोज कडे पाहून निर्माण होतो. पावसाळ्यातील भन्नाट AI फोटोज सादर केले आहेत. याद्वारे भविष्यातील मुंबई असे भाकित सादर केले आहे.
04/12
गेल्या काही वर्षात हवामान बदलाचा सामना जगभरात केला जात आहे. हवामान बदलामुळे समुद्राच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे यामागील कारण मानले जात आहे. हिमालयातील बर्फ वेगाने वितळत असल्याने समुद्राची पाणी पातळी वाढत आहे. यामुळे समुद्रा लगतच्या शहरांना अधिक धोका आहे.
05/12
धक्कादायक म्हणजे जगातील 10 धोकादायक शहरांमध्ये मुंबईच्या नावाचा देखील सहभाग आहे. मुंबई दरवर्षी दोन किलोमीटर समुद्रात जात असल्याचे आयआयटी मुंबईच्या एका सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. त्यामुळे येत्या काळात त्यानुसार उपाययोजना कराव्या लागू शकतात.
06/12
काही वर्षांमध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि गरज पाहता आर्टिफिशल इंटलिजन्टसने भविष्यातील मुंबईतील वाहतूक व्यवस्था मांडली आहे.
07/12
एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिस्टने काही वाहनांची कल्पना केली आहे जी पावसाळ्यासाठी अगदी योग्य असतील. फोटोत काली पिली टॅक्सी, बेस्ट बस, टुव्हिलर आदी वाहतूक व्यवस्थेबाबतचे हे भाकित वर्तवण्यात आले आहेत.
08/12
मनोज ओमरे (@manojomre) नावाच्या कलाकाराने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केली आहेत ज्यात त्यांनी Midjourny नावाचे एआय टूल वापरून डिझाइन केलेली काही वाहने आहेत. ‘मुंबईसाठी आत्तापर्यंत ज्या गोष्टी बनवायला हव्यात’ असे या मालिकेचे नाव आहे.
09/12
इन्स्टाग्रामवर AI फोटो शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे की, कारण चांगले रोड्स आणि ड्रेनेज सिस्टम पागलच बनवतात.
10/12
मनोजने शेअर केलेल्या AI फोटोजवर अनेकांनी कमेंट्स आणि लाईक्स केल्या आहेत.
11/12
फोटो : मनोज ओमर इन्स्टाग्राम