कांदिवलीत रिक्षाचालकांनी काढला मोर्चा

कांदिवली - अवैध रिक्षांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करावी यासाठी रिक्षा मजदूर युनियनतर्फे कांदिवली पश्चिमेकडील वाहतूक विभागवार मंगळवारी रिक्षाचालकांनी मोर्चा काढला. या मोर्चात मालाड, कांदिवलीतील 200 हून अधिक रिक्षाचालक सहभागी झाले होते. रिक्षा मजदूर युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.

कांदिवली वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त भरत दराडे यांची भेट घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई करावी अशी मागणी केल्याचं शशांक राव यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या