मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. फुकट्या प्रवाशांविरोधात राबवलेल्या मोहिमेत विनातिकीट आणि बेकायदेशीर सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडून २൦१७ -१८ मध्ये १५३ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, विना तिकीट प्रवास केलेल्या ३१. ४५ लाख गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षी २൦१६ -१७ मध्ये २६.८८ लाख गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होता. आता यामध्ये १६.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी दंडाच्या रुपात १२८.६३ कोची रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. अशाप्रकारे यामध्ये १९.८५ टक्क्यांनी वाढ झाली.
मार्च २൦१८ दरम्यान आरक्षित प्रवासी तिकीट हस्तांतरणाचे १९९ प्रकरणांची नोंद झाली आणि दंडाच्या रुपात१.८१ लाख रूपये वसूल करण्यात आले. दरम्यान, प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे.