१० ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे चालवणार ४५३ उपनगरी गाड्या

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यानं मध्य रेल्वे प्रशासनानं लोकलसेवा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २२ अतिरिक्त सेवांची वाढ करण्यात आली आहे. साध्यस्थितीत ४३१ सेवा मध्य रेल्वेवर धावत असून त्यामध्ये २२ अतिरिक्त सेवांची वाढ करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासनानं अधिसूचित केल्यानुसार मध्य रेल्वे सध्या कर्मचार्‍यांसाठी ४३१ विशेष उपनगरी सेवा चालवित आहे.  सामाजिक अंतराचं पालन करण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं १० ऑक्टोबरपासून दैनंदिन विशेष उपनगरी सेवांची संख्या ४३१ वरुन ४५३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या ४३१ विशेष उपनगरी सेवांच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.

अतिरिक्त २२ सेवा

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  - कसारा विशेष थानशेत आणि उंबरमाळी वगळता इतर सर्व स्थानकांवर थांबतील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  - कर्जत विशेष शेलू सोडून इतर सर्व स्थानकांवर थांबतील. 
  • छत्रपती शिवाजी महाराज - पनवेल विशेष रे रोड, कॉटन ग्रीन, किंग्ज सर्कल, चुनाभट्टी आणि मानसरोवर स्थानक वगळता इतर  सर्व स्थानकांवर थांबतील.

महाराष्ट्र शासनानं परवानगी दिलेल्या सर्व प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर, गाडीत चढताना व उतरताना आणि विशेष उपनगरी गाड्यांमध्ये प्रवास करताना सोशल डिस्टंसिंगचे  निकष पाळण्याची आणि मास्क घालण्याची विनंती केली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या