मुंबई - ऐन सकाळी टिटवाळा-आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे लांबचा अंतर गाठून दादरला येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झालेत. सध्या रेल्वेकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे. या वेळी संतप्त प्रवाशांनी रुळावर उतरून आंदोलन केलं. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.