वसई विरारमधील टॅक्सी-रिक्षा मीटरने धावणार?

वसई-विरार महानगरपालिका (vvmc) क्षेत्रात मीटरने सेवा सुरू करण्यासाठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना 15 नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात येत आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत या परिसरात मीटरने टॅक्सी (Meter taxi) आणि रिक्षा (Meter rikshaw) सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते.

आमदार स्नेहा दुबे, राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी आणि अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कलासकर यावेळी उपस्थित होते.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात शेअर्ड टॅक्सी सेवांना परवानगी आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी प्रवाशांची फसवणूक करू नये; प्रवाशांकडून तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातून ठाणे आणि कल्याणपर्यंत लांब पल्ल्याच्या बस सेवा सुरू कराव्यात. प्रवाशांची संख्या लक्षात घेता, शहर बस वाहतूक पूर्ण क्षमतेने चालवावी. असे निर्देश देखील देण्यात आले.

महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेची जमीन पार्किंगसाठी वापरावी. जर जागेची आवश्यकता असेल तर महानगरपालिकेने जागेचे नियोजन करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरार (virar), वसई (vasai road) आणि नालासोपारा (nala sopara) येथे बस डेपो स्थापन करावेत.

नागरिकांना वाहतूक सेवा सहज उपलब्ध होतील अशा प्रक्रिया महानगरपालिकेने तयार करून अंमलात आणाव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.


हेही वाचा

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

दहावी आणि बारावी परिक्षांची तारीख जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या