रेल्वेमंत्र्यांना पत्र
खासदार मनोज कोटक यांनी याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. गणपती, होळी सणाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची दादर आणि ठाणे स्थानकांत मोठी गर्दी होते. भांडुप परिसरात कोकणवासीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना दादर किंवा ठाणे स्थानकांत जाण्यासाठी सामानासह धावपळ करावी लागते. म्हणूनच गणपतीसह होळी आणि मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत धावणाऱ्या सुटीविशेष गाड्या भांडुपला थांबवाव्यात, असे कोटक यांचे म्हणणे आहे.
प्रवाशांची संख्या अधिक
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या अधिक वाढली असून, त्या तुलनेत अद्याप हव्या तशा सुधारणा या मार्गावर झालेल्या नाहीत, याकडेही कोटक यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
कोकण रेल्वेच्या सुधारणेसाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन असे दोन्ही प्रकारचे उपाय करण्याची विनंतीही कोटक यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना केली आहे.