मुंबईचं अर्थचक्र हळुहळु पूर्वपदावर येत असतानाच आता मुंबईतील वाहतूक (mumbai transport) सेवाही सुरू करण्यात येत आहे. रविवारी मोनोरेल (monorail) प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून सोमवारपासून मेट्रो सेवाही (mumbai metro) सुरू होणार आहे. सर्व मुंबईकरांसाठी घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सुविधा सोमवारपासून सुरू होणार आहे. एकतृतीयांश प्रवासी क्षमतेसह मेट्रो फेऱ्यांची संख्या अर्ध्यावर आणण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये ठप्प झालेली मेट्रो सेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर सर्व सुरक्षा चाचण्या आणि विविध उपाययोजना करीत मेट्रो सुविधा सोमवारपासून कार्यरत होत आहे.
सोमवारपासून दिवसभरात मेट्रोच्या २०० फेऱ्या होणार असून एका वेळी फक्त ३६० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. अंतरनियम आणि आरोग्य सुरक्षेसंदर्भात मेट्रो रेल्वे आणि स्थानकांवर व्यवस्थापनानं केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मेट्रो- १चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय कुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारपासून मेट्रोची वारंवारिता ६.३० ते ८ मिनिटांवर आणण्यात आली आहे. कोरोनापूर्व काळात हीच वारंवारिता ३ ते ५ मिनिटे इतकी होती. त्यामुळे कोरोनापूर्व काळात दिवसाला ३५० ते ४०० फेऱ्या होत होत्या. त्याऐवजी आता दिवसाला केवळ २०० फेऱ्या होणार आहेत. सुरुवातीच्या काही दिवसांनतर फेऱ्यांची संख्या वाढवायची का, याबाबत विचार केला जाणार आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी संख्या वाढल्यास घाटकोपर आणि वर्सोवा येथे प्रत्येक एक मेट्रो कायम तयारीत ठेवलेली असेल. त्याचा वापर त्वरित केला जाईल.
असा होणार प्रवास