बंगळुरूला जाणाऱ्या खासगी बसेस रद्द

कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या निर्णयानंतर कर्नाटक आणि तामिळनाडूत हिंसाचार सुरू झाल्याने मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या खासगी बसेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी अनेक खासगी  बस  ऑपरेटनी बंगळुरूला जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या. यामध्ये के. सी. बर्ड ट्रॅव्हल्स, शर्मा ट्रॅव्हल्स, एसआरएस ट्रॅव्हल्स आणि  नॅशनल ट्रॅव्हल्ससारख्या अनेक कंपन्यांनी सोमवारी बंगळुरूला जाणाऱ्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या