मुंबई-गोवा ‘वंदे भारत’मध्ये लवकरच स्लिपर कोच, 'या' तारखेपासून होणार बदल

मुंबई आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोव्याला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सुरु होताच प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.  मुंबई-मडगाव (Mumbai Madgaon Vande Bharat Express) वंदे भारत सुरू  होताच एक्स्प्रेस फुल झाली होती. दरम्यान, यानंतर आता रेल्वेने वंदे भारतमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई ते गोवा अंतर 586 किमी असून वंदे भारतने प्रवास करण्यासाठी 8 तासांचा वेळ लागतो. पण पावसाळ्यात ही वेळ दोन तासांनी वाढते. त्यामुळे मुंबईहून गोव्याला पोहोचण्यासाठी 10 तास लागतात. 

पण मुंबई ते गोवा हे 10 तासांचं अंतर पार करताना प्रवाशांना सलग बसून प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना व्यवस्थित आराम करण्याची संधी मिळत नाही. यामुळे आता रेल्वे मुंबई-गोवा वंदे भारतमध्ये स्लीपर कोच जोडण्याचं नियोजन आखत आहे. यामुळे प्रवासी आता निसर्गाचा आनंद घेण्यासह आरामही करू शकतात. 

लवकरच वंदे भारतमधील आसन श्रेणीत बदल करून शयनयान डबे जोडण्यात येणार आहेत. याबाबत रेल्वे मंडळाकडून नियोजन सुरू आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला स्लीपर कोच डबे जोडण्याची घोषणा केली आहे. रेल्वे त्यासंबंधी नियोजन आखत आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला भविष्यात स्लीपर कोच जोडण्यात येतील. 

रेल्वे मंडळाने आता आयसीएफला स्लीपर कोच असणाऱ्या वंदे भारतची निर्मिती करण्याची सूचना केली आहे. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. हे डबे टप्प्याटप्याने जोडण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. तसंच यानंतरदोन शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस मार्गाचे अंतर 550 किमीहून अधिक असेल. 


हेही वाचा

मुंबईकरांना मिळणार समुद्रातून चौथी लाईफलाइन! लोकल, बेस्ट बस आणि मेट्रोनंतर आता जलवाहतुकीवर भर

पुढील बातमी
इतर बातम्या