पश्चिम रेल्वेनं ७१८ बेघर मुलांची केली घरवापसी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अनेकदा बरीच लहान मुलं कुटुंबीयांचा राग आल्यानं घर सोडून जाताततर काही मुलं अन्य कारणांसाठी घर सोडतातमात्रघर सोडल्यानंतर या मुलांना पुन्हा घरी परतता येणं शक्य होत नाहीत्यामुळं ही मुलं रेल्वे स्थानकांवर भटकताना दिसतातपरंतूअशा एकूण ७१८ बेघर झालेल्या मुलांची पश्चिम रेल्वेनं घरवापसी केली आहेपश्चिम रेल्वे सुरक्षा दलानं (आरपीएफराज्य पोलीसगुप्तहेर संस्थास्वयंसेवी संघटना यांच्या समन्वयानं मार्च २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान बेघर झालेल्या तब्बल ७१८ मुलांची घरवापसी केली आहेतसंच१ एप्रिल ते २० मे दरम्यान ६६ मुलांची सुटका केली आहे.

७१८ मुलांची सुटका

पश्चिम रेल्वेच्या चाइल्ड हेल्पलाइननं महत्त्वाची भूमिका निभावली आहेदरम्यानबेघर झालेली मुलं तस्करीला बळी पडतातत्याशिवाय अनेक मुलं रेल्वे स्थानकावर भटकताना दिसतातअशा एकूण ७१८ बेघर मुलांची सुटका पश्चिम रेल्वेनं केली आहेयामध्ये मुंबई सेंट्रल विभागातून ३८१बडोदा ७१अहमदाबाद ४४रतलाम १७४राजकोट २३ आणि भावनगर विभागातून २५ मुलांची सुटका केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

चाइल्ड हेल्पलाइनमार्फत मोहिम

पश्चिम रेल्वेच्या चाइल्ड हेल्पलाइनमार्फत एक मोहिम सुरु केली आहेया मोहिमेर्तंगत हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात येतेतसंचया चाइल्ड हेल्पलाइनतर्फे एखादा मुलगा संकटात असल्याचं आढळल्यास त्याच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच तो चुकीच्या व्यक्तीकडं जाणार नाही याची काळजी घेतली जाते.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रलवांद्रे टर्मिनससुरतबडोदाअहमदाबादरतलाम आणि राजकोट स्थानकांवर चाइल्ड हेल्पलाइन डेस्कची स्थापना करण्यात आली आहेया मुलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेद्वारा महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या मदतीनं उपाययोजना करण्यात येत आहे.


हेही वाचा -

गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, रेल्वे वाहतूक उशीरानं

जोगेश्वरीमध्ये सिलेंडरचा स्फोट, १३ जण गंभीर जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या