महाराष्ट्र सरकार लाडकी बहिण योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांवर अंकुश लावण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले की, या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेणाऱ्यांची चौकशी करून त्यांना लाभ घेण्यापासून रोखले जाईल.
त्यांनी पुधे सांगितले की, बेकायदेशीर लाभ घेणाऱ्या 26 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची चौकशी केली जात आहे. सरकारने लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जर चौकशीत कोणी चुकीचे लाभ घेत असल्याचे आढळून आले तर त्याचे खाते तात्काळ बंद केले जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोक योजनेचा चुकीचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
या योजनेअंतर्गत, प्रति कुटुंब 21 ते 65 वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ मिळतो. परंतु अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात लाभार्थ्याचे वय निर्धारित मर्यादेबाहेर आहे, तरीही त्या दरमहा 1500 रुपयांची मदत घेत आहेत.
तसेच, अशी प्रकरणे देखील समोर आली आहेत जिथे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या योजनेचा उद्देश योग्य पात्र महिलांना मदत करणे आहे, परंतु आता मोठ्या संख्येने चुकीचे दावेदार पुढे येत आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर, बेकायदेशीर दावेदारांना लाभांपासून वंचित ठेवले जाईल. सरकार लवकरच एक अहवाल प्रसिद्ध करेल, ज्यामध्ये किती लोक चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत होते हे स्पष्ट होईल.
हेही वाचा