गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गाजत असलेल्या फेरीवालाप्रकरणी आता आणखी राजकारण रंगणार आहे. त्याचं कारण आहे मुंबईतील फेरीवाल्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पुढे सरसावणार आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दुपारी यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली.
फेरीवाल्यांसंदर्भातील १ नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता, त्या निर्णयाला संजय निरुपम सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत आणि त्यासाठी कपिल सिब्बल हा खटला लढवतील, असं म्हटलं जात आहे.
फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात दाद मागणारे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना उच्च न्यायालयाने दणका दिला होता.
हेही वाचा