ही पाणी कपात एमआयडीसी Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) यांच्या अखत्यारीतील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील बारवी ग्रॅव्हिटी मेन लाईन क्रमांक 1, 2 आणि 3 च्या तातडीच्या दुरुस्ती आणि सुधारणा कामांमुळे करण्यात येत आहे.
23 एप्रिल रोजी आंध्रा आणि बारवी धरणांतील पाणीटंचाईबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने ही कामे केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
संपूर्ण प्रभाग समिती क्षेत्रात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद राहील.
मात्र प्रभाग क्रमांक 26 आणि 31 मधील काही भागांना या कपातीमधून सूट देण्यात आली आहे.
रुपादेवी पाडा
किसननगर क्रमांक 2
नेहरू नगर
कोलशेत खालचा गाव परिसर
महापालिकेने नागरिकांना आधीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठा शुक्रवार दुपारनंतर पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील 24 ते 48 तास पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा