भांडुपमध्ये ८ गांजा तस्करांना अटक

भांडुप परिसरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांनी डोकं वर काढलं अाहे. याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभाग (एएनसी) कडे तक्रारी  केल्या अाहेत. या तक्रारींची दखल घेत पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने बुधवारी रात्री भांडुप येथे विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ८ तस्करांना अटक केली अाहे.  त्यामध्ये एका ५० वर्षीय महिलेचाही समावेश आहे. या तस्करांकडून ९ किलो ३०० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे.

९ किलो गांजा हस्तगत

भांडुपच्या ३९१ बस स्टाॅप, किन्दी पाडा, भांडुप गावदेवी रोड, श्रीराम पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दुल्यांचा वावर वाढला असल्याची माहिती मुंबईच्या एएनसी पथकाला मिळाली होती. तसंच नागरिकांच्या तक्रारीही येत असल्याने पोलिस आयुक्त सुबोध जैयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने या भागात धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी विजय विष्णू पंडीत (२६), मुस्तफा शेख (२१), शक्ती पुजारा (३२), उत्तम कांबळे (४६), कमलेश गौतम (२६), साईपण सांगोली (२१) आणि जसुदा गायकवाड (५०) या गांजा तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ८६ हजार रुपये किमतीचा ९ किलो ३०० ग्रॅम गांजा हस्तगत केला अाहे. 


हेही वाचा -

कापड व्यापाऱ्याची धोपाटण्याने मारून हत्या

लोकलखाली उडी मारून महिलेची आत्महत्या


पुढील बातमी
इतर बातम्या