महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १०वीची परीक्षा २९ एप्रिल, तर १२वीची २३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्यानं ऑफलाइन होणाऱ्या या परीक्षांच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी कोणत्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, यासंदर्भातील नियमावली येत्या २ दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
१०वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर १२वीची २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहे. तसंच, १०वीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर १२वीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा परीक्षा ५ ते २२ एप्रिलदरम्यान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची सर्व काळजी घेऊन या परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना येत्या २ दिवसांत देण्यात येतील.
दिल्या जाणाऱ्या त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी, अस आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले.
शाळा, महाविद्यालयांना देणार लेखी सूचना
हेही वाचा -
धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र
१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता