सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक, कंगना रणौतचा आरोप

अभिनेत्री कंगना रणौत मुंबईवरून चंदिगडला गेली आहे. मात्र त्यानंतरही तिच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कंगनानं पुन्हा आरोप केले आहेत. यावेळी तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आदित्य ठाकरेंच्यावरही टीका केली आहे.

कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सुशांतच्या हत्येला जबाबदार असणारे आणि बॉलिवूडमधले माफिया, ड्रग्ज रॅकेट या सगळ्यांचे कारनामे मी उघड केले, हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण आहे. या सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक आहे. हे सगळं उघड करणं हाच माझा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला.

ट्विटमध्ये तिनं पुढे म्हटलं आहे की, मी या सगळ्यांची हे उद्योग उघड केल्यानंच ते मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पाहूया नेमकं कोण जाळ्यात अडकतं ते.

दरम्यान, कंगना प्रकरण हे आता आमच्यासाठी बंद झाल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. मात्र या प्रकरणातल्या सर्व घडामोडींवर आमचं लक्ष असल्याचं सूचक वक्तव्य रविवारीच खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.


हेही वाचा

शूटिंगदरम्यानच कोसळला अभिनेता, मदतीला कुणीच न आल्यानं जागीच झाला मत्यू

मिम्स शेअर करत कंगनाकडून मुख्यमंत्र्यांना रावणाची उपमा

पुढील बातमी
इतर बातम्या