॥दक्षिण मुंबईचा मान तू॥
॥उमरखाडीची शान तू॥
॥भक्तांच्या श्रद्धेचा स्थान तू॥
॥देव माझा, उमरखाडीचा राजा॥
१९४८ साली स्वातंत्र्यसेनानी कै. बाळू चांगू पाटील यांनी मुंबईतील उमरखाडी परिसरात ‘उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळा’ ची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या आदेशाला मान देत बाळू चांगू पाटील यांनी उमरखाडीचा राजाची स्थापना केली.
मंडळ आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने विभागीय लोकांसाठी पालिकेचं आरोग्य शिबीर असतं. मंडळाच्या वतीने विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो. मंडळाने सगळ्यांसाठी मोफत वाचनालय सुरु केलं आहे. दरवर्षी २५ डिसेंबरला चिमुकल्यांसाठी मंडळ बाल शिबिराचं आयोजन करते. गजानन पाटील सध्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर सुनील भोईर आणि भारत भोईर मंडळाच्या कार्याध्यक्षपदी आहेत.
हेही वाचा