कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील जीआर राज्य सरकारनं काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत आहे. आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
मदत मिळवण्यासाठी हे नियम
दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सरकारनं भरपाईची रक्कम ४ लाखांपर्यंत वाढवावी, असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
अहवालानुसार, मृतांच्या नातेवाईकांना दिलेली भरपाईची रक्कम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) द्वारे व्यवस्थापित केली जाते. ज्याद्वारे ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ७५:२५ च्या प्रमाणात सामायिक केली जाते.
आत्तापर्यंत, ५०,००० रुपये नुकसान भरपाई निधी म्हणून ठरवण्यात आले होते. परंतु मंत्री थोरात यांनी ही रक्कम अपुरी आहे आणि ती वाढवावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा