डिसेंबर २०२० मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं घाटकोपर आणि विद्याविहारला जोडणारा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गर्दीचे ओझे कमी करण्यासाठी रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बांधण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.
या पुलाचे बांधकाम रेल्वे प्रशासनासह सर्व मंजुरीनंतर पालिकेमार्फत केले जात आहे. याशिवाय, विद्याविहारच्या पूर्व उपनगरामध्ये महाराष्ट्राचे सर्वात मोठे ९९.३५ मीटर गर्डर बसवण्यात येणार आहे.
हे माहित नसलेल्यांसाठी, मध्य रेल्वेनं (CR) २०१६ पासून वर्षानुवर्षे अडकून राहिलेल्या डिझाइन आणि रेखांकनांना २ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा मंजूरी दिली. कल्याणमध्ये नुकत्याच स्थापित केलेल्या पत्रीपुलमध्ये सध्या ७६.६७ मीटर लांबीचा पुल गर्डर आहे.
या पुलाची लांबी ४८० मीटर असेल आणि त्यापैकी २२३ मीटर रुळाच्या वरच्या रेल्वेच्या जागेवर असतील. सुमारे २५ मीटर रूंदीचे चार गर्डर रेल्वे रुळावरुन जातील. सीआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, हे एक मोठे काम असेल ज्यास दोन ते तीन वर्षे लागतील. यापूर्वी मंजूर झालेल्या प्रकल्पाची किंमत जून २०१६ पासून वाढली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा