आदित्य ठाकरे यांचा विश्वास आहे की, मुंबई आणि मीरा भाईंदरमधील कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी BMC प्रस्तावित ६ किमी लांबीचा ४५ मीटर-रुंद रस्ता बांधणार असल्याची घोषणा त्यांनी ट्विटरवर केली. सध्याच्या दहिसर लिंक रोड ते भाईंदरसाठी हे केलं जाणार आहे.
यापैकी १.५ किमी बृहन्मुंबई महानगरपालिकेत (MCGM), उर्वरित ४.५ किमी मीरा भाईंदर कॉर्पोरेशनमध्ये असेल, असं ते म्हणाले.
आम्ही MMR मध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेनं काम करत असताना, मुंबई-मीरा भाईंदर कनेक्टिव्हिटीची वाढती गरज आहे.
ठाकरे म्हणाले, "हा प्रस्तावित उत्तरेकडील किनारी रस्त्याचा एक भाग आहे. अत्यंत आवश्यक असल्यानं, पालिका हा ६ किमीचा रस्ता युद्धपातळीवर तयार करेल. "
या व्यतिरिक्त, ठाकरे यांना विश्वास आहे की, यामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर अशी चांगली कनेक्टिव्हिटी सक्षम होणार नाही तर प्रवासाचा वेळ कमी होण्यासही मदत होईल. याशिवाय दहिसर पूर्व आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) वरील रहदारी आणि ताण कमी होईल.
ठाकरे यांनी गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दहिसर टोलनाक्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. त्यावेळी त्यांनी टोलनाका वापरणाऱ्या वाहनधारकांना दिलासा देण्याचं आश्वासन दिलं होतं.
हेही वाचा