गेल्या २४ तासात सांताक्रुज वेधशाळेनं ११४ मिमी पावसाची नोंद केली असून कुलाबा वेधशाळेनं ४१ मिमी पावसाची नोंद केली आहे. गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत दर दिवशी १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. येत्या ४८ तासानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.
मुंबईत पुढचे ३ तास तरी पावसाची शक्यता नसली तरी ठाणे, विरार, पालघर, या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.