भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी घेतलेल्या आघाडीमुळे जवळपास त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे. यावर पत्रकारांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी हा निवडणूक आयोगाचा विजय असल्याचं सांगितलं. पालघरमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. आम्हाला मतं देणाऱ्या मतदारांचे आम्ही आभारी आहोत, भाजपाचा विजयही आम्हाला मान्य आहे, परंतु २०१९ च्या निवडणुकीत आम्हीच विजयी होणार असं राऊत म्हणाले.