नवाब मलिकांमुळे मुंबईत महायुतीत तणाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे ग्रँड अलायन्समध्ये तणावाचे संकेत दिसत आहेत.

भाजप नवाब मलिक यांना सोबत घेण्यास तयार नाही. त्यामुळे मुंबईत फक्त शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपच मैदानात उतरणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

नवाब मलिक NCP चे नेतृत्व करणार

जर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणार असतील, तर मुंबईत भाजप–NCP युती होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, आशीष शेलार आणि अमित साटम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की,

नवाब मलिक जर मुंबई महानगरपालिकेसाठी NCP चे नेतृत्व करणार असतील, तर भाजप मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही. त्यामुळे अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत एकटीच निवडणूक लढवणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिंदे गटाची शिवसेनाही त्याच भूमिकेवर

भाजपनंतर आता शिंदे गटाच्या शिवसेनेनेही नवाब मलिक यांच्याबाबत तशीच भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले की, नवाब मलिक यांच्याबाबत भाजपची भूमिका शिवसेनेलाही मान्य आहे.

NCP ची संपूर्ण जबाबदारी नवाब मलिकांकडे

अजित पवार यांनी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे सोपवली आहे, यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.

नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीची बैठक घेतली. या बैठकीला झीशान सिद्दीकी आणि सना मलिक हे देखील उपस्थित होते. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. तर मुंबईत महायुती म्हणून लढण्याला विरोध होत असल्याचंही संकेत मिळत आहेत.

NCP ची 50 जागांसाठी तयारी

भाजपकडून नवाब मलिक यांना विरोध झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसोबत किंवा त्याशिवाय लढण्याची तयारी पूर्ण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, NCP मुंबईत किमान 50 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

महायुतीत राहायचं की नाही, याचा अंतिम निर्णय अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

BJP–शिंदे शिवसेनेची पहिली संयुक्त बैठक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची पहिली संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नवाब मलिक यांच्या नावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला युतीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुंबईत 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे.

आशीष शेलार यांनी स्पष्ट केलं की, पुढील एक ते दोन दिवसांत जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल.


हेही वाचा

पाणीटंचाईमुळे ठाण्यात पाण्याचा काळाबाजार

पुढील बातमी
इतर बातम्या