विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan sabha election) तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवेंद्रराजे भोसले (shivendra raje bhosale), मधुकर पिचड (madhukar pichad), वैभव पिचड (vaibhav pichad), चित्रा वाघ (chitra wagh), कालिदास कोळंबकर (kalidas kolambkar) आणि संदीप नाईक (Sandeep naik), सागर नाईक (Sagar naik) यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात (BJP) उडी मारली. मुंबईतील गरवारे क्लब (garware club) येथील कार्यक्रमात या नेत्यांच्या पाठिराख्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीकडे पाहता भाजपाची जणू मेगाभरती सुरू असल्याचा भास होत होता.
महाराष्ट्रातल्या आपल्या राजकीय कारकिर्दीनेवेगळी ओळख निर्माण केलेले अनेक दिग्गज नेते भाजपाच्या परिवारात आले याचा खूप आनंद होत आहे. या सर्वांचं भाजपात स्वागत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
आम्हाला महाराष्ट्रात विकासाचं राजकारण करायचं आहे. म्हणूनच माझ्यासहीत इतर नेत्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री यापुढंही चांगलं काम करतील. अपेक्षा आहे की भाजपात आम्हाला बरोबरीची वागणूक मिळेल, असा विश्वास मधुकर पिचड यांनी व्यक्त केला.हेही वाचा-
गणेश नाईकांनी पक्ष खड्ड्यात घातला, जितेंद्र आव्हाडांनी डागली तोफ
मला नाही पक्षबदलूंची चिंता, शरद पवार असं का म्हणाले?