संपूर्ण देशात महाआघाडी असावी, अशी जनतेची भावना असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं. जेमतेम अवघ्या दीड मिनिटांच्या पत्रकार परिषदेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष केलं.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ही पत्रकार परिषद नियोजित होती. मात्र ती सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुरू झाली आणि 9.23 पूर्वीच म्हणजे पावणे तीन मिनिटांत संपली.
पंतप्रधान, भाजप आणि आरएसएस यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना निर्माण झाली आहे. दररोज पेट्रोलचे दर आकाशाला भिडत आहे, हा पैसा कुठं जातो? गरिबांचे पैसे घेऊन सर्वात श्रीमंताचे खिसे भरले जात आहेत. पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणावी परंतु पंतप्रधानांना इंटरेस्ट नाही असं म्हणत राहुल गांधीनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
नोटबंदी केली, गब्बरसिंह टॅक्स लागू केला. त्यामुळे संपूर्ण देशातील जनता नाराज आहे. छोटा व्यापारी दु:खी आहे.त्यासाठीच आमची लढाई सुरू असल्याचंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा -