शिवसेनेकडून जीवाला धोका : किरीट सोमय्या

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेकडून जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यासंदर्भात किरीट यांनी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाठवलं आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, मी अनेक घोटाळे आत्तापर्यंत उघडकीस आणले, अनेक प्रकरणं उघड केली. पण मला कधी भीती वाटली नाही. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचे लोक हल्ला करण्यासाठी आले होते हे लक्षात घेतलं पाहिजे. आताही काही धमक्या येत आहेत. शिवसेनेची ही गुंडगीरी जगासमोर यावी यासाठी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाठवलं आहे

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. शिवसेनेकडून भाजपवर सातत्यानं टीका करण्यात येत होती. शिवसेनेच्या या तोफखान्याला उत्तर देण्यासाठी भाजपकडून किरीट सोमय्या मैदानात उतरले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणली होती. त्यावरून शिवसेनेचे नेते आणि सोमय्यांमध्ये वादही झालेत. त्याचा राग असल्यानं सोमय्यांना तिकीट देऊ नका अशी मागणी शिवसेनेनं केली होती. त्यानंतर भाजपाकडून सोमय्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं.


हेही वाचा

शरद पवारांचा होणार राऊतांशी ‘सामना’, 'इथं' घेणार मुलाखत

केंद्राच्या जीवावर कर्जमाफीची घोषणा केली का? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पुढील बातमी
इतर बातम्या