'मोदी तुम्हाला देश माफ करणार नाही', - राज ठाकरे

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टवरून मोदी यांच्यावर केली आहे.

'भ्रष्टाचारी नंबर वन'

उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना, 'भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला', असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. या विधानावर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून कडाडून टीका करण्यात येत असतानाच राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

फेसबुकवरून टीका

आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं या ३ गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


हेही वाचा -

अखेरच्या सामन्यात मुंबईचा कोलकात्यावर ९ गडी राखून विजय


पुढील बातमी
इतर बातम्या