नितीन नांदगावकर यांच्या आरोपांना उत्तर, अविनाश जाधव यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नेत्यांना माझी वाढत असलेली लोकप्रियता बघवली नाही, असं म्हणत पक्ष सोडणारे नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवबंधन हाती बांधून घेतलं. त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना नांदगावकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यात खूप घाई केल्याचं वक्तव्य जाधव यांनी केलं.

चर्चा करायची होती

नांदगावकर यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ठाण्यातील उमेदवार अविनाश जाधव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याचं म्हटलं जात होतं. त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाले,

 “नितीन नांदगावकर मनसेचे चांगले कार्यकर्ते होते. परंतु त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घाईत घेतला. त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून सोडवायला हव्या होत्या. त्यातून नक्कीच मार्ग निघाला असता. त्यांना या निर्णयाची भविष्यात नक्की जाणीव होईल.,”

असंही ते म्हणाले.

नांदगावकर यांचा आरोप

नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर मनसैनिकांकडून जहरी टीका करण्यात आली. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचं म्हटलं जात होतं. तेव्हा त्यांनी पक्ष सोडण्यामागचं कारण सांगितलं. “आपण सुरू केलेल्या जनता दरबारात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करत होतो. परंतु या जनता दरबारामुळे मला मिळत असलेली लोकप्रियता मनसेच्या काही नेत्यांच्या डोळ्यात खूपली. त्यामुळे त्यांनी हा जनता दरबार बंद करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. एवढंच नाही, तर मला दुसरा पक्ष काढण्याचा सल्लाही देण्यात आला. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला पक्षबदलाचा निर्णय घ्यावा लागला.” असं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं.


हेही वाचा-

मनसेचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत

मनसेच्या नितीन नांदगावकर यांना तडीपारची नोटीस


पुढील बातमी
इतर बातम्या