परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून राऊत यांनी Bike Taxi सुरू झाल्यास राज्यातील हजारो रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली.
राऊत यांनी सरकारला सवाल केला की, नवीन Bike Taxi सेवेला परवानगी देण्यापूर्वी सध्या रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे का?
विशेषतः अनेक तरुणांसाठी रिक्षा हा रोजगाराचा महत्त्वाचा स्रोत असल्याचं सांगत त्यांनी या निर्णयाच्या परिणामांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली.
राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राजकीय व्यवस्थेवरही टीका करत पारंपरिक रिक्षाचालकांवर या निर्णयाचा किती परिणाम होणार आहे, याचं सरकारने मूल्यांकन केलं आहे का, असा सवाल उपस्थित केला.
आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या रिक्षाचालकांसमोर Bike Taxiमुळे आणखी स्पर्धा निर्माण होऊन त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता राऊत यांनी व्यक्त केली.
कामगार आणि बेरोजगार मराठी तरुणांच्या हिताकडे दुर्लक्ष करून परिवहन धोरण ठरवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी Bike Taxiच्या निर्णयाचा फेरविचार करून रिक्षाचालकांच्या रोजगारावर होणारा परिणाम तपासावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात ॲप-बेस्ड मोबिलिटी सेवा विरुद्ध पारंपरिक रिक्षा-टॅक्सी व्यवसाय असा वाद पुन्हा चर्चेत आला असून, Bike Taxiच्या मुद्द्याला आता राजकीय रंगही चढला आहे.
हेही वाचा